AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : “टीम इंडियासोबतचा 17 वर्षांचा….”, वर्ल्ड कपआधी हिटमॅन निवृत्तीबाबत म्हणाला..

Rohit Sharma On Retirement : रोहित शर्मा 2007 पासून टीम इंडियासाठी खेळतोय. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

Rohit Sharma : टीम इंडियासोबतचा 17 वर्षांचा...., वर्ल्ड कपआधी हिटमॅन निवृत्तीबाबत म्हणाला..
rohit sharma team indiaImage Credit source: Rohit Sharma X Account
| Updated on: May 15, 2024 | 6:35 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातून मुंबई इंडियन्सचं पॅकअप झालंय.आता काही दिवसांनी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता मोजून 17 दिवस शिल्लक आहे. आयसीसीच्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेचं आयोजन हे 2 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 20 संघांमध्ये एका वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर हार्दिक पंड्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी रोहित शर्माने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. रोहितने या मुलाखतीत निवृत्तीबाबत बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माने dubai eye 103.8 या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. एकूण तिघांनी रोहितची मुलाखत घेतली. एकूण 21 मिनिटं आणि 34 सेंकदांचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. रोहितने या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. रोहितने क्रिकेट कारकीर्द, कॅप्टन्सी आणि विविध मुद्द्यांना हात घालत त्याला काय वाटतं हे सांगितंल.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“टीम इंडियासोबतचा 17 वर्षांचा शानदार राहिला. तसेच आशा आहे की मी आणखी काही वर्ष खेळून वर्ल्ड क्रिकेटवर प्रभाव टाकेन. मी माझ्या आयुष्यात प्रगतीपेक्षा जास्त अधोगती पाहिली आहे. मी आज जे आहे ते मी पाहिलेल्या चढ-उतारांमुळे आहे, त्यामुळे मी आहे”, असं रोहितने स्पष्ट करत पुढील आणखी काही वर्ष खेळत असल्याचं म्हणत निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावला.

हिटमॅन निवृत्तीबाबत म्हणाला…

तसेच रोहितने वैयक्तिक विक्रमांपेक्षा कर्णधारपद महत्वाचं असल्याचं म्हटलं. टीम इंडियाची कॅप्टन्सी करणं हे माझ्यासाठी गर्वाची आणि सन्मानाची बाब आहे. मी इथवर पोहचेन आणि नेतृत्व करेन, असा विचारही कधी केला नव्हता. चांगल्या माणसांसोबत चांगलं होतं. नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा एका दिशेने पुढे जायचं ठरवलेलं. सांघिक खेळ अशाच प्रकारे खेळायला हवा. याचा वैयक्तिक विक्रम याच्यासह काही घेणंदेणं नाही. 11 खेळाडूंनी एकत्र खेळायला हवं आणि ट्रॉफी जिंकणं हा अंतिम उद्देश असायला हवा” असं रोहितने म्हटलं.

Follow Us
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.