AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: टी 20i वर्ल्ड कपआधी भारताच्या डोकेदुखीत वाढ, नागपूरमध्ये असं झालं

India vs New Zealand 1st T20i : सामना जिंकल्यानंतर साधारणपणे टीमकडून किंवा खेळाडूकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष होतं. मात्र भारताच्या 2 फलंदाजांनी नागपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढवलं आहे.

IND vs NZ: टी 20i वर्ल्ड कपआधी भारताच्या डोकेदुखीत वाढ, नागपूरमध्ये असं झालं
Team India Abhishek Sharma and Suryakumar Yadav Huddle TalkImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 22, 2026 | 5:57 PM
Share

टीम इंडिया आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधी शेवटची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडियासमोर या 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचं आव्हान आहे. भारताने बुधवारी 21 जानेवारीला न्यूझीलंडवर 48 धावांनी मात करत मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 190 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर करत नागपुरात सलग आणि एकूण चौथा टी 20i विजय साकारला. भारताच्या या विजयानंतरही चिंतेत वाढ झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भारताचे टॉप ऑर्डरमधील 2 अपयशी ठरलेले फलंदाज.

नक्की काय झालं?

विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याने नागपूरमधील सामन्यातून टीम इंडियात 2 वर्षांनंतर कमबॅक केलं. त्यामुळे इशानकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा होती. मात्र इशानने निराशा केली. इशानला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तसेच संजू सॅमसन हा देखील नववर्षातील पहिल्याच टी 20i सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. संजू 10 धावा करुन माघारी परतला. इशान आणि संजू दोघेही विकेटकीपर आहेत. या दोघांचा टी 20i वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेआधी शेवटच्या मालिकेत दोघांनी अशी सुरुवात केल्याने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

वर्ल्ड कपआधीची ही शेवटची मालिका असल्याने भारतीय खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. अशात हे दोघे अपयशी ठरले. दोघेही विकेटकीपर असल्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकत्र दिसणार नाहीत हे निश्चित आहे.

इशानकडे शेवटची संधी!

संजू सॅमसन हा टीम मॅनेजमेंटची विकेटकीपर म्हणून पहिली पसंत आहे. तसेच इशानला तिलक वर्मा याच्या जागी स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे तिलक दुखापतीतून परतल्यास त्याचं प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार हे निश्चित आहे. त्यामुळे जर इशानला आपला दावा मजबूत करायचा असेल तर त्याला गेम दाखवण्याशिवाय पर्याय नाही.

इशान आणि संजू दोघेही टॉप ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज आहे. टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर संघाला आक्रमक तसेच किमान चांगली सुरुवात करुन देणं अपेक्षित असतं. मात्र यात संजू आणि इशान दोघेही ढेर ठरले.

संजूला नागपूरमध्ये सुरुवात तर मिळाली होती. मात्र संजू त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला. संजूने 2 चौकारांसह एकूण 10 धावा केल्या. तसेच इशाननेही कमबॅकमधील सामन्यात 2 चौकारांच्याच मदतीने 8 धावा जोडल्या. आता हे दोघेही दुसऱ्या सामन्यात नागपूरमधील चूक सुधारणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.