AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा दुसऱ्यांदा मोठा पराभव, राजीनामा देणार का? स्वत:च दिलं उत्तर

टीम इंडियावर देशात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका गमवण्याची वेळ आली. पहिल्यांदा न्यूझीलंडने आणि त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने पराभवाची धूळ चारली. दोन्ही संघांनी टीम इंडियाला क्लिन स्विप दिला. त्यामुळे गौतम गंभीरवर टीकचे झोड उठली आहे.

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा दुसऱ्यांदा मोठा पराभव, राजीनामा देणार का? स्वत:च दिलं उत्तर
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा दुसऱ्यांदा मोठा पराभव, राजीनामा देणार का? स्वत:च दिलं उत्तरImage Credit source: PTI
| Updated on: Nov 26, 2025 | 3:51 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगणार असं दिसत आहे. कारण भारतात झालेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 2-0 ने क्लिन स्विप मिळाला आहे. त्यामुळे आता विजयी टक्केवारी वाढवण्याचं गणित खूपच कठीण झालं आहे. खरं तर गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा सलग दुसरा मोठा पराभव आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला क्लिन स्विप दिला. त्यामळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच काय तर अनेकांनी गौतम गंभीरला प्रशिक्षणपदावरून दूर सारण्याची मागणी केली आहे. पण गौतम गंभीरने या चर्चांवर थेट उत्तर देत सांगितलं की, याबाबत निर्णय तो घेणार नाही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काय ते ठरवेल. इतकंच काय तर गौतम गंभीरने प्रत्युत्तर देताना सांगितलं की, त्याच्या कारकि‍र्दीत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

कसोटी प्रशिक्षणाबाबत गौतम गंभीर काय म्हणाला?

दक्षिण अफ्रिकेने क्लिन स्विप दिल्यानंतर गौतम गंभीरने या पराभवाचं खापर सर्वांवर फोडलं. त्याची सुरुवात स्वत:पासून होत असल्याचं सांगितलं. इतकंच काय तर पत्रकार परिषदेत भविष्यात कसोटी क्रिकेटचं प्रशिक्षकपद कायम असेल की नाही? याबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा गौतम गंभीरने सांगितलं की, ‘याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआयकडे आहे. मी प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, मी महत्त्वाचा नाही. भारतीय क्रिकेट महत्त्वाचं आहे. तुम्ही हे विसरू नका की माझ्या प्रशिक्षणाखालीच भारताने इंग्लंडमध्ये कसोटी सीरिज ड्रॉ केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे.’

गौतम गंभीरने सांगितलं की, टीम इंडिया सध्या कात टाकत आहे. सध्याच्या संघात अनुभवाची उणीव आहे. इतकंच काय तर कसोटीत टीम इंडियाला नंबर 1 करायचं असेल तर त्याला प्राथमिकता देणं भाग आहे, असंही म्हंटलं. गौतम गंभीर म्हणाला की, ‘आम्हाला चांगलं खेळण्याची आवश्यकता आहे. 95/1 असताना अचानक 122 वर 7 विकेट हे स्वीकार्य नाही. तुम्ही एका खेळाडूला किंवा एका शॉटला दोष देऊ शकत नाही. मी कधीही कोणालाही दोष दिलेला नाही आणि देणारही नाही.’

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.