AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला

आयपीएल 2026 स्पर्धा अर्थात 19वं पर्व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामन्यानंतर संपेल. पुढच्या पर्वाची त्यानंतर तयारी सुरू होईल. असं असताना आयपीएल हा फक्त फलंदाजांचा खेळ आहे अशा तक्रारी येत आहे. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने तीन सल्ले दिले आहेत.

आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला
आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्लाImage Credit source: PTI
| Updated on: May 31, 2026 | 4:38 PM
Share

टी20 क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धा ही फलंदाजांच्या बाजूने झुकलेली आहे. त्यामुळे गोलंदाजांची भूमिका फक्त धावा रोखण्यासाठी मर्यादीत राहिली आहे. गोलंदाजांचं करिअरही फार काळ टिकत नाही. त्यामुळे एखाद्या सामन्यात आक्रमक फलंदाजीचा फटका बसला गोलंदाजाला पुढच्या सामन्यात संधी मिळेल की नाही हे कठीण आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये दोन्ही बाजू समतोल असण्याची गरज आहे. हा असमतोल दूर करण्यासाठी, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने तीन बदल सुचवले आहेत. या बदलामुळे गोलंदाजांनाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोणते तीन बदल सुचवले ते जाणून घेऊयात..

इमॅक्ट प्लेयर: सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाकण्याची सूचना केली आहे. या नियमामुळे सर्व संघ 8 किंवा 9 क्रमांकापर्यंतचे फलंदाज खेळवत आहेत. यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झाले आहे. सचिन तेंडुलकरच्या मते हा नियम काढून टाकून 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवणे योग्य ठरेल. या नियमाला दिग्गज खेळाडूंचाही विरोध आहे.

पाच षटकांची परवानगी: टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला फक्त चार षटकं टाकण्याची परवानगी आहे. त्यामुळे हा नियम बदलण्याची गरज असल्याचं त्याचं मत आहे. गोलंदाजांना पाच षटकं टाकण्याची परवानगी दिली पाहीजे. यामुळे सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला अधिक प्रभाव टाकण्यास मदत होईल. त्यामुळे धावगतीला ब्रेक लावता येईल.

पावरप्लेचा नियम बदला: टी20 क्रिकेटमध्ये सहा षटकांचा पावरप्ले असतो. त्यामुळे दोनच क्षेत्ररक्षक बाहेर क्षेत्ररक्षण करत असतात. या नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. यात चार षटकांचा पावरप्ले हा फलंदाजांसाठी आणि 2 षटकांचा पावरप्ले हा गोलंदाजांसाठी असावा. या दोन षटकात तीन खेळाडूंना सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणाची परवानगी असावी, तसेच पावरप्लेमध्ये दोन षटकं कधीही वापरण्याची परवानगी असावी. यामुळे धावगतीला ब्रेक लागणार नाही. पण कर्णधारांना रणनिती आखता येईल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे तीन बदल सूचवले आहेत. या बदलाची अमलबजावणी बीसीसीआय आणि आयसीसी येत्या काळात करणार का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. यातला आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर हा नियम पुढच्या पर्वात काढण्याची शक्यता आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.