AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Varma: तिलक वर्माने काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाला, ‘ते आमच्यासमोर…’

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 5 विकेटने शानदार विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात तिलक वर्माने नाबाद 69 धावांची खेळी करून सर्वांची मने जिंकली.

Tilak Varma: तिलक वर्माने काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाला, 'ते आमच्यासमोर...'
Tilak Varma
| Updated on: Sep 30, 2025 | 4:40 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 5 विकेटने शानदार विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात तिलक वर्माने नाबाद 69 धावांची खेळी करून सर्वांची मने जिंकली. तिलकने हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात53 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यानंतर तिलक वर्मासह भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. तिलक हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांने पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी अंतिम सामन्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे.

तिलक वर्माने काढली पाकिस्तानची लायकी

तिलक वर्माने पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ‘मी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मताशी सहमत आहे. आता भारत आणि पाकिस्तान मोठे प्रतिस्पर्धी नाहीत. पाकिस्तानचा संघ आमच्या समोर टिकण्याच्या लायकीचा नाही.’ पुढे बोलताना तिलकने म्हटले की, भारत-पाकिस्तान सामन्यात दबाव होता. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दबाव जाणवत होता, परंतु देशाला विजय मिळवून द्यायचा हा विचार मनात होता. 1.4 अब्ज भारतीयांसाठी सामना जिंकणे ही माझी प्राथमिकता होती.

पाकिस्तानी खेळाडू मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते – तिलक

पाकिस्तानने दिलेल्या 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताची धावसंख्या 2 बाद 10 असताना तिलक फलंदाजीला आला आणि त्यानंतर भारताची धावसंख्या 3 बाद 20 झाली. त्यामुळे भारतावर दबाव निर्माण झाला होता. यावर बोलताना तिलक म्हणाला की, ‘कठीण परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडू मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.3 विकेट गेल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी आमच्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती.’

पाकिस्तानने जोरदार स्लेजिंग केली – तिलक

पुढे बोलताना तिलक म्हणाला की, भारतावर दबाव असताना पाकिस्तानने जोरदार स्लेजिंग केली, परंतु देशाला विजय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यात पडणार नाही हे कदाचित पाकिस्तानला माहिती नव्हते. त्यामुळे आम्ही बॅटने उत्तर दिले. मोदींनी ऑपरेशन सिंदूरसारखे ऑपरेशन टिळक असे नाव दिल्यावर मला खूप आनंद झाला. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही यावेळी तिलकने सांगितले.

Follow Us
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण