AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : विराट की रोहित? टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार कोण?

Virat Kohli and Rohit Sharma Test Captaincy : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी गेली एकूण 10 वर्ष भारतीय कसोटी संघाची धुरा सांभाळली. या 2 दिग्गजांची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घ्या.

Test Cricket : विराट की रोहित? टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार कोण?
Virat Kohli and Rohit Sharma Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: May 13, 2025 | 2:06 PM
Share

भारतीय कसोटी संघात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आर अश्विन याने निवृत्ती घेतली. त्यानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी काही तासांच्या अंतराने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. यासह टेस्ट क्रिकेटमधील रोहित-विराट युगाचा अंत झाला. अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर रोहित आणि विराट या जोडीवर क्रिकेट चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. मात्र आता रोहित आणि विराटने कसोटीतून निवृ्त्ती घेतल्याने चाहत्यांना त्या दोघांची उणीव भासणार आहे. या निवृत्ती निमित्ताने दोघांची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी कशी राहिलीय? हे जाणून घेऊयात.

विराट कोहलीची आकडेवारी

महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने 2014 साली कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. तेव्हापासून विराट युगाला सुरुवात झाली. विराटने आपल्या नेतृत्वात अनेक खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. विराटने संघाची मोट बांधली. विराटने आक्रमक कर्णधार अशी स्वत:ची प्रतिमा तयार केली. विराटने सौरव गांगुली याच्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना लढायला, भिडायला आणि अरे ला का रे करायलं शिकवलं.

विराट सर्वात यशस्वी कर्णधार

विराटने भारतीय संघांचं एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. विराटने त्यापैकी 40 सामन्यांमध्ये भारताला विजयी केलं. तर 17 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने बरोबरीत सुटले. विराट टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.

5 हजार पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार

विराट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. विराटने कसोटी कर्णधार म्हणून 5 हजार 864 धावा केल्या आहेत. तसेच विराटने या दरम्यान 20 शतकं आणि 18 अर्धशतकं लगावली. विराट कसोटीत 5 हजार धावा करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

रोहित पर्वाची सुरुवात

विराट कोहली याने जवळपास 8 वर्ष भारताचं नेतृत्व केल्यानंतर 15 जानेवारी 2022 रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटनंतर रोहित शर्मा याला कर्णधार करण्यात आलं. रोहितने जेमतेम 2 वर्ष कॅप्टन्सी केली. रोहितने या दरम्यान 24 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. रोहितला 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात यश आलं. तर टीम इंडियाला 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. रोहितच्या कॅप्टन्सीत 3 सामना अनिर्णित राहिले. रोहितने कर्णधार म्हणून 24 सामन्यांत 4 शतकांसह 1 हजार 254 धावा केल्या.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड