AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी टीम इंडियाला कधी मिळणार? एसीसी बैठकीतून समोर आली अपडेट

भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण भारताला जेतेपदाची ट्रॉफी काही मिळाली नाही. त्यामुळे आशिया क्रिकेट परिषदेने दुबईत एका बैठकीचं आयोजन केलं होतं. ही बैठक मोहसिन नकवीच्या अध्यतेखाली पार पडली.

आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी टीम इंडियाला कधी मिळणार? एसीसी बैठकीतून समोर आली अपडेट
आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी टीम इंडिया कधी मिळणार? एसीसी बैठकीतून समोर आली अपडेटImage Credit source: PTI
| Updated on: Sep 30, 2025 | 8:02 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचं नाणं खणखणीत वाजलं. भारताने एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. विशेष पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं. यात अंतिम फेरीतही पराभवाची धूळ चारली. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण खरा वाद हा ट्रॉफी स्वीकारण्यावरून झाला. भारतीय संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. इतकंच काय इतर कोणाच्या हातून घेऊ असं देखील सांगितलं. पण मोहसिन नकवी हे काही ऐकलं नाही. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा मोहसिन नकवी पदकं आणि ट्रॉफी स्वत:सोबत घेऊन गेले. त्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी कधी मिळणार? यावरून चर्चा सुरु झाली. त्यामुळे मंगळवारी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक दुबईत आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीतही ट्रॉफीबाबत अंतिम काही ठरलं नाही.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत खरं तर ट्रॉफी व्यतिरिक्त उपाध्यक्षाची निवड आणि अंडर 19 स्पर्धेसाठी चर्चा होणार होती. पण ट्रॉफीचा मुद्दा इतका गाजला की इतर मुद्दे बाजूलाच राहिले. अखेर आशियाई क्रिकेट परिषदेने ही समस्या सोडवण्यासाठी पाच कसोटी खेळणाऱ्या देशांना म्हणजेच त्याच्या क्रिकेट बोर्डाच्या हाती निर्णय सोपवला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने बीसीसीआय, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, बांगलादेश क्रिकेट बोर्ड , श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांना ट्रॉफी वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी औपचारिक ऑफलाइन बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, एसीसीने आयोजित केल्या बैठकीत बीसीसीआयच्या वतीने राजीव शुक्ला आणि आशीष शेलार वर्च्युअल रुपाने उपस्थित होते.

दुसरीकडे, मोहसिन नकवी यांनी काही अटी ठेवल्याचा चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या भारताला आशिया कप ट्रॉफी हवी असेल तर त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला एसीसी कार्यालयात घेऊन यावं. तसेच त्यांच्याकडूनच स्वीकारवी अशी अट ठेवली आहे. पण भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआय अशा अटींना भीक घालणार नाही. भारतीय संघ विजयी झाला आहे आणि ट्रॉफीची गरज नाही. उलट असं काही असेल तर मोहसिन नकवींची जगभरात नाचक्की होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...