AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र? कोणाचा होणार पत्ता कट? जाणून घ्या

IPL 2025 Playoff Scenario: आयपीएलमध्ये प्लेऑफ स्थान निश्चित करण्यासाठी किमान 16 गुण पुरेसे आहेत. पण दहाही संघांमध्ये चांगली स्पर्धा असेल तर ते 14 किंवा 12 गुण मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती सामने जिंकायचे ते

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र? कोणाचा होणार पत्ता कट? जाणून घ्या
| Updated on: Apr 29, 2025 | 4:39 PM
Share

इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत 47 सामने पूर्ण झाले आहेत. या सामन्यांच्या शेवटी एका संघाचे 14, तीन संघांचे प्रत्येकी 12 गुण होते आहेत. तर इतर संघही उर्वरित सामन्यांचं गणित पाहता शर्यतीत आहेत. या आठवड्यात प्लेऑफचं चित्र काही अंशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संघांची धाकधूक वाढली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होणार आहे. जर आपण पाहिले की प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला किती सामने जिंकावे लागतील…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तसेच गुणतालकिते टॉपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून 4 सामने खेळायचे आहेत आणि यापैकी एक सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित 4 पैकी 2 सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.

गुजरात टायटन्स: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स 9 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. 16 गुण मिळवण्यासाठी आणि पुढील टप्प्यात जाण्यासाठी गुजरात टायटन्सला उर्वरित 5 पैकी दोन सामने जिंकावे लागतील.

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 9 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. जर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पुढील 5 पैकी दोन सामने जिंकले, तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित करतील.

पंजाब किंग्ज: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण मिळाला आहे. त्यामुळे 11 गुण झाले आहेत. जर त्यांनी उर्वरित 5 पैकी तीन सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

लखनौ सुपरजायंट्स: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स संघाने खेळलेल्या 10 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. जर त्यांनी उर्वरित 4 पैकी 3 सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचतील.

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे. त्यामुळे एक गुण मिळाला आहे. जर त्यांनी उर्वरित 5 पैकी 5 सामने जिंकले तर त्यांना 17 गुण मिळू शकतात. अशा प्रकारे टॉप 4 मध्ये येऊ शकता.

राजस्थान रॉयल्स: संघाने 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. आरआरला अजून 4 सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी ते सर्व जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. पण ते फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाचे 14 गुण असतील. त्यातही नेट रनरेट चांगला असायला हवा.

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. जर सनरायझर्स हैदराबादने त्यांचे उर्वरित सर्व पाच सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

चेन्नई सुपर किंग्ज: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने खेळलेल्या 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. अजून पाच सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी हे सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. पण पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचे 14 गुण असल्यास ते नेट रन रेटच्या आधारे प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....