AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने रोहित शर्मानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची तीन मोठी कारणं, जाणून घ्या

टी20 आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीनंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. विराट कोहलीने मागच्या 14 वर्षात 123 कसोटी सामने खेळले आहेत. यात 30 शतकं त्याच्या नावावर आहेत. तर 7 द्विशतकांचा समावेश आहे. असं असताना रोहित शर्मानंतर तात्काळ विराट कोहलीने निवृत्ती का घेतली? जाणून घ्या कारणं

विराट कोहलीने रोहित शर्मानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची तीन मोठी कारणं, जाणून घ्या
विराट कोहली Image Credit source: PTI
| Updated on: May 12, 2025 | 4:41 PM
Share

विराट कोहलीने 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दिला अचानक पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर सहा दिवसात विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. टी20 वर्ल्डकप 2024 नंतर असंच चित्र पाहायला मिळालं होतं. विराट कोहलीने जेतेपदानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पण विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण काय? कसोटी क्रिकेट विराट कोहलीच्या हृदयाजवळ होतं. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विराट कोहली 123 कसोटी सामन्यात 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यात विराट कोहलीने 30 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच सातवेळा द्विशतक ठोकण्याचा विक्रमक केला आहे. इतकंच काय तर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 40हून अधिक कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात विराट कोहलीने नेमका असा निर्णय का घेतला असावा?

बीसीसीआयवर नाराज?

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्यापूर्वी बीसीसीआयवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर एक वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यात संघाचं कर्णधारपद भूषवू इच्छित आहे, अशी बातमी पसरली होती. पण बीसीसीआयने यासाठी स्पष्ट नकार दिला होता. हा खेळाडू विराट कोहली तर नव्हता ना? कारण रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटला रामराम ठोकेल अशी काहीच चर्चा नव्हती. पण त्याने अचानकपणे कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. विराट कोहलीने नाराज होत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दीर्घकालीन खराब फॉर्म

विराट कोहली दीर्घ काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे. मागच्या वर्षी 10 कसोटी सामन्यात त्याने 24.52 च्या सरासरीने 417 धावा केल्या. मागच्या पाच वर्षात फक्त 2023 हे वर्ष विराट कोहलीला चांगलं गेलं. या वर्षात त्याने 50हून अधिक सरासरीने धावा केल्या. पण 2020 मध्ये त्याची सरासरी 19.33, 2021 मध्ये 28.21 आणि 2022 मध्ये त्याची सरासरी 26.50 होती.

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच वाईट गेला. त्याने पाच कसोटी सामन्यात फक्त 190 धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी फक्त 23.75 इतकी होती. यातही पहिल्या कसोटी सामन्यात शतक आलं होतं. यावरून विराट कोहलीने इतर चार सामन्यात काय कामगिरी केली हे लक्षात येतं. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं सहाजिकच होतं. त्यामुळे त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव वाढला होता.

Follow Us
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद