AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s World Cup : भारताला उपांत्य फेरीचं तिकीट कसं मिळणार? जाणून घ्या एका जागेचं संपूर्ण समीकरण

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीचं गणित आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. तीन संघ निश्चित झाले आहे. तर एका संघासाठी जोरदार चुरस आहे. त्यात भारताचं उपांत्य फेरीचं गणित कसं असेल ते समजून घ्या

Women's World Cup : भारताला उपांत्य फेरीचं तिकीट कसं मिळणार? जाणून घ्या एका जागेचं संपूर्ण समीकरण
Women's World Cup : भारताला उपांत्य फेरीचं तिकीट कसं मिळणार? जाणून घ्या एका जागेचं संपूर्ण समीकरण
| Updated on: Oct 20, 2025 | 5:12 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 20 सामन्यांचा खेळ संपला आहे. यातून तीन संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांना उपांत्य फेरीत जागा मिळाली आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी पाच संघ शर्यतीत आहेत. सर्वच संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले असून दोन सामने शिल्लक आहे. दुसरीकडे अजूनही या स्पर्धेतून कोणताच संघ उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरलेला नाही. म्हणजेच पाचही संघांना तितकीच संधी आहे. खरं तर चौथ्या जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. त्यात या दोन संघ दोन पैकी एका सामन्यात भिडणार आहे. या सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीचं गणित जवळपास स्पष्ट होणार आहे. टीम इंडिया चौथ्या स्थानावर असून 4 गुण आणि +0.526 नेट रनरेट आहे. त्यामुळे भारताने उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर जाग निश्चित होईल. पण एका सामन्यात विजय आणि एका सामन्या पराभव झाला तर मात्र गणित जर तरवर येईल. भारतीय संघाचं संपर्ण समीकरण समजून घेऊयात.

भारताचे या स्पर्धेतील दोन सामने शिल्लक असून न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. यातील न्यूझीलंडविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या दोन संघात चौथ्या जागेसाठी तगडी स्पर्धा आहे. भारताप्रमाणे न्यूझीलंडचेही 4 गुण आहेत. पण त्यांचा नेट रनरेट हा -0.245 इतका असल्याने पाचव्या स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साममा 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना गमावणाऱ्या संघाला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी चमत्काराची आशा बाळगावी लागणार आहे. भारताचा या स्पर्धेतील शेवटचा सामना 26 ऑक्टोबरला बांगलादेशशी होणार आहे.

न्यूझीलंडचा दुसरा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 26 ऑक्टोबरलाच होणार आहे. त्यामुळे हा दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरेल. म्हणजेच 23 तारखेला भारत न्यूझीलंड सामन्यात पराभूत होणारा संघ 26 ऑक्टोबरपर्यंत आशेवर असेल. कारण पराभूत होणाऱ्या संघाला 26 तारखेपर्यंत आशा असतील. जर 23 तारखेला विजया झालेला संघ 26 तारखेला पराभूत झाला आणि 23 तारखेला पराभूत झालेला संघ विजयी झाला तर मात्र गणित नेट रनरेटवर येऊन ठेपेल. नेट रनरेट चांगला असलेल्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. पण यातही बांग्लादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेपैकी ज्याचे 6 गुण असतील त्याचा नेट रनरेट महत्त्वाचा असेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.