AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025-27 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया कधी आणि किती सामने खेळणार ते वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसरा विजेता दक्षिण अफ्रिका संघ ठरला आहे. असं असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट क्रिकेट 2025-27 स्पर्धेची घोषणा केली आहे. यात सहभागी असलेल्या 9 संघात 71 सामने खेळले जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात श्रीलंका बांग्लादेश कसोटीपासून होईल.

WTC 2025-27 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया कधी आणि किती सामने खेळणार ते वाचा
शुबमन गिल कसोटी कर्णधारImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2025 | 2:47 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तीन पर्व यशस्वीरित्या पार पडली आहे. तिन्ही पर्वात नवा विजेता समोर आला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेने जेतेपदावर नाव कोरलं आहे. असं असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. एकूण 9 संघ जेतेपदासाठी लढत देणार आहेत. या पर्वाची सुरुवात 17 जूनपासून होणार आहे. पहिला सामना श्रीलंकेतील गॉलमध्ये श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. या पर्वात एकूण 71 सामने होणार आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 22 सामने खेळणार आहे. तर इंग्लंड 21 सामने खेळणार आहे. या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड एशेज मालिका होणार आहे. न्यूझीलंड 16, वेस्ट इंडिज 14, दक्षिण अफ्रिका 14, पाकिस्तान 13, श्रीलंका 12 आणि बांग्लादेश 12 कसोटी सामने खेळणार आहे. तर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास 20 जूनपासून होणार आहे. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना लीड्सवर होणार आहे.

भारतीय संघ एकूण 18 कसोटी सामने खेळणार

भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आलं आहे. दोन वर्षात टीम इंडिया 18 कसोटी सामने खेळणार आहे. यापैकी पाच कसोटी सामन्यांची मालिका ही इंग्लंडविरुद्ध आहे. तर उर्वरित 13 सामन्यात वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडशी खेळणार आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याच देशात खेळणार आहे. तर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्या्ंच्या देशात होणार आहेत. इंग्लंडविरुद्ध 5, वेस्ट इंडिजविरुद्ध 2, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5, श्रीलंकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने असतील.

  • इंग्लंड: 5 सामन्यांची मालिका (20 जूनपासून इंग्लंडमध्ये)

  • ऑस्ट्रेलिया: 5 सामन्यांची मालिका (भारतामध्ये)

  • वेस्ट इंडिज: 2 सामन्यांची मालिका (भारतामध्ये)

  • दक्षिण आफ्रिका: 2 सामन्यांची मालिका (भारतामध्ये)

  • श्रीलंका: 2 सामन्यांची मालिका (श्रीलंकेत)

  • न्यूझीलंड: 2 सामन्यांची मालिका (न्यूझीलंडमध्ये)

तिसऱ्या पर्वात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्याने भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची असेल तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान असणार आहे. या दोन मालिकांमध्ये यश मिळालं तर भारताचा प्रवास सुकर होईल. अन्यथा इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून राहावं लागेल. दरम्यान दक्षिण अफ्रिकन संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. तर सप्टेंबर 2026 मध्ये दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका असेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.