AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी, 51 वर्षानंतर भारतीय ओपनरने केलं असं काम

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने 51 वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. त्याच्या खेळीमुळे बरंच काही घडलं आहे. चला जाणून घेऊयात..

यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी, 51 वर्षानंतर भारतीय ओपनरने केलं असं काम
यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी, 51 वर्षानंतर भारतीय ओपनरने केलं असं कामImage Credit source: PTI
| Updated on: Jul 23, 2025 | 8:14 PM
Share

तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने सावध पण चांगली सुरुवात केली.यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वालने मोर्चा सांभाळला. त्याने 96 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात ऐतिहासिक नोंद केली आहे. मागच्या 50 वर्षात भारतीय ओपनरला या मैदानात अशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालचा खेळ 58 धावांवर संपुष्टात आला. त्याने 107 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 58 धावाा केल्या. या खेळीमुळे भारतीय संघाला एक चांगली सुरुवात मिळाली. मागच्या 51 वर्षात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारतीय ओपनरने 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या नव्हत्या. यशस्वी जयस्वालपूर्वी सुनील गावस्कर यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी 1974 मध्ये हा कारनामा केला होता.

यशस्वी जयस्वालने या खेळीसह इंग्लंडविरुद्ध कसोटीत 1000 धावाही पूर्ण केल्या आहे. यात इंग्लंडविरुद्ध एक शतक आणि दोन द्विशतकांचा समावेश आहे. तसेच पाच अर्धशतकही ठोकली आहेत. त्याने 66.86 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत त्याने 2089 धावा केल्या. त्यापैकी निम्म्या धावा या इंग्लंडविरुद्ध आहेत. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा भारताचा 20वा खेळाडू आहे. मोहम्मद अझरुद्दीनसह 16 डावात 1000 धावा करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने 15 डावात ही कामगिरी केली आहे.

दरम्यान, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलची विकेट पडल्यानंतर कर्णधार शुबमन गिलकडे लक्ष होतं. मात्र त्याला या सामन्यात काही खास करता आलं नाही. त्याचा डाव अवघ्या 12 धावांवर संपुष्टात आला. त्याने 23 चेंडूत 1 चौकार मारत 12 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. भारताला हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. तसं झालं नाही तर किमान ड्रॉ करून मालिकेचं गणित पाचव्या कसोटीवर न्यावं लागेल. कारण आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.