AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Schedule : शेड्यूलमध्ये मोठा बदल, भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास सामने कुठे होणार? ICC चा मोठा निर्णय

T20 World Cup 2026 New Schedule : टी20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान आयसीसीने सेमीफायनल मॅचच्या वेन्यू संदर्भात नवीन गाइडलाइन्स जारी केली आहे. त्यानंतर शेड्यूलमध्ये मोठा बदल पहायला मिळतोय. कुठली टीम क्वालिफाय करणार त्यावर सुद्धा हा बदल अवलंबून आहे.

T20 World Cup 2026  Schedule : शेड्यूलमध्ये मोठा बदल, भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास सामने कुठे होणार? ICC चा मोठा निर्णय
T20 World Cup 2026
| Updated on: Feb 24, 2026 | 8:35 AM
Share

T20 World Cup 2026 New Schedule : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सध्या सुपर-8 राऊंडचे सामने सुरु आहेत. यानंतर नॉकआऊटच्या मॅचेस होतील. यात दोन सेमीफायनल आणि एक फायनल आहे. हे सर्व मोठे सामने आहेत. आयसीसीने त्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे टुर्नामेंटच्या शेड्यूलमध्ये बदल पहायला मिळू शकतो. कुठली टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आणि कोणाचा सामना कोणाबरोबर होईल यावर सुद्धा हा बदल अवलंबून आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने अलीकडेच सेमीफायनलच्या वेन्यू बद्दल गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर महत्वाची भूमिका आहे.

त्यानुसार श्रीलंकेला घरच्या मैदानावर सेमीफायनलचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते. भारत आणि श्रीलंका यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचे यजमान आहेत. सेमीफायनलसाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यात आलं आहे. त्यानुसार सामना भारतात कोलकाता, मुंबई आणि त्याशिवाय श्रीलंकेत कोलंबोमध्ये होऊ शकते. खासकरुन पहिल्या सेमीफायनलची स्थिती फ्लोटिंग आहे. कोलंबो किंवा कोलकता या दोनपैकी एका ठिकाणी सेमीफायनल खेळवण्याचा निर्णय होऊ शकतो.

श्रीलंका-भारत सेमीफायनलमध्ये असतील तर सामना कुठे होईल?

आयसीसीनुसार, जर पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ते आपला सामना 4 मार्चला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळतील. पाकिस्तानी टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला नाही आणि श्रीलंकेने क्वालिफाय केलं तर तर श्रीलंका भारत वगळता अन्य कुठल्याही टीम विरुद्ध कोलंबोमध्येच सेमीफायनलचा सामना खेळू शकते. पाकिस्तानच्या सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी श्रीलंकेला प्राधान्य असेल असं टुर्नामेंट आधीच आयसीसीने जाहीर केलं होतं. आता श्रीलंकेची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर भारत सोडून अन्य कुठल्याही टीम विरुद्ध ते मायदेशात खेळू शकतात. जुन्या शेड्यूलनुसार श्रीलंकन टीमला भारतात सेमीफायनलचा सामना खेळावा लागणार होता. पण आता आयसीसीने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

भारतात सेमीफायनलसाठी कुठल्या वेन्यूंची निवड?

भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. पण तीच सेमीफायनल मॅच पाकिस्तान विरुद्ध असल्यास सेमीफायनल कोलंबोला जाऊन खेळावी लागेल. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या नाहीत तर पहिला सेमीफायनल सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स आणि दुसरा मुंबईत होईल.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.