AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Womens T20 World Cup Final : सलग 5 व्यांदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता, भारताचा दारुण पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतपदाची लढत सुरु आहे. या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले (ICC Womens T20 World Cup final) आहे.

ICC Womens T20 World Cup Final : सलग 5 व्यांदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता, भारताचा दारुण पराभव
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Mar 08, 2020 | 6:27 PM
Share

मेलबर्न : आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2020 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव (ICC Womens T20 World Cup final) केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 184 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 99 धावांत गारद झाला. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भारतीय फलंदाजांनी अक्षरश: विकेट फेकल्या. त्यामुळे टीम इंडियाला 85 धावांनी हार पत्कारावी लागली. ऑस्ट्रेलियाने सलग पाचव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद पटकावले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात (ICC Womens T20 World Cup final) नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांच्या धडाकेबाजी फलदांजीमुळे भारताला 185 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली.

सलामीवीर शफाली वर्मा ही अवघ्या 2 धावा करुन बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. यानंतर स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर या ही काही फरकाने आऊट झाल्या. टीम इंडियाकडून एकट्या दिप्ती शर्माने 33 धावा केल्या. मात्र भारताचे इतर 6 फलंदाज अवघ्या एक आकडी धावसंख्या करत बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 4  विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरुवात करत अवघ्या 5 षटकात 47 धावा केल्या. तर एलिसा हेली 30 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर ती झेलबाद झाली. तिने 39 चेंडूत 5 षटकारांसह 75 धावा केल्या.

त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना टीम इंडियाकडून दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी घेतले.

कर्णधार मेग लॅनिंग 16 धावांवर बाद झाल्यानंतर गार्डनरही २ धावात माघारी परतली. पण बेथ मूनीच्या नाबाद 78 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 184 धावांचा टप्पा गाठला.  ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये हा सामना झाला.

टीम इंडियासाठी खास दिवस

2018 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चुरशीच्या सामन्यात मात दिली होती. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतरही आधीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ फायनल दाखल झाला होता.

ICC Womens T20 World Cup : फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कोण?

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमचा इतिहास सर्वांना माहित आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 19 सामने झाले आहेत. यात भारतीय संघ 6 वेळा विजयी झाला आहे. तर ऑस्ट्रेलिया 13 सामन्यात विजयी झाला आहे.

तर टी-20 विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 सामने झाले आहेत. त्यात 2 सामने भारताने जिंकले आहेत. तर दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी झाला आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय टीम इंडियासाठी फार खास असणार आहे.

भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास

भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकाही विश्वचषकावर नाव कोरलेले नाही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली. मात्र, यंदाचा विश्वचषक भारताच्या थोडक्यात निसटला. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली. विशेष म्हणजे भारताने विश्वचषक स्पर्धेत एकही सामना गमावलेला (ICC Womens T20 World Cup final) नाही.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ