India vs England 4th Test | कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत ‘विराट’ रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

India vs England 4th Test | कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत 'विराट' रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी
विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 8:38 AM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये कसोटी मालिकेतील चौथा (India vs England 4th Test) आणि शेवटचा सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीचा आजचा (5 मार्च) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसखेर टीम इंडियाने 1 विकेट गमावून 24 धावा केल्या. मैदानात सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. या सामन्यात विराटने शतक लगावताच या विक्रमाची बरोबरी होईल. (india vs england 4 th test virat kohli have chance to level ricky ponting international hundreds)

काय आहे रेकॉर्ड?

विराटला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या आंतरराष्ट्रीय शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत रिकी पॉन्टिंगच्या नावे एकूण 71 शतकांची नोंद आहे. तर विराटने एकूण 70 आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहेत. यामुळे विराटने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावल्यास तो या विक्रमाची बरोबरी साधू शकेल.

विराटची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 70 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे विराटला या सामन्यात शतकासह पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची नामी संधी आहे.

चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची फार चांगली सुरुवात राहिली नाही. पाहुण्या फलंदाजांनी तिसऱ्या कसोटीसारखंच भारतीय गोलंदाजांसमोर पाचारण केलं. बेन स्टोक्सने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फार यश आले नाही. इंग्लंडकडून स्टोक्सने सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला टीम इंडियाच्या बोलर्सनी मैदानात टिकू दिले नाही.

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळलं. फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. आर अश्विनने 3 बळी घेतल्या. तर मोहम्मद सिराजनेही 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर टीम इंडिया मैदानात आली. भारताची खराब सुरुवात झाली. डावातील तिसऱ्याच चेंडूवर युवा सलामीवीर शुबमन गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहित आणि पुजाराने डाव सावरला. दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही ओव्हर्स बाकी होत्या. या जोडीने सावध खेळ करत विकेट गमावली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 8 तर पुजारा 15 धावांवर नाबाद होते.

संबंधित बातम्या :

India vs England 4th Test, Day 1 Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

(india vs england 4 th test virat kohli have chance to level ricky ponting international hundreds)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.