AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind Vs Eng : इंग्लंडचा भारतावर दिमाखदार विजय, टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे!

 इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs England 3Rd T20I) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. India Vs England t20 match

ind Vs Eng : इंग्लंडचा भारतावर दिमाखदार विजय, टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे!
जॉस बटलरच्या बहारदार खेळीपुढे भारताचं नामोहरण
| Updated on: Mar 17, 2021 | 7:11 AM
Share

अहमदाबाद :   इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs England 3Rd T20I) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. जोस बटलरच्या (Jos buttler) भन्नाट खेळीमुळे भारताचा निभाव लागला नाही. भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जोस बटलरने (Jos Buttler) 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. या सामन्यात भारताने अनेक निर्णय चुकले. पहिल्यांदा बॅटिंग करताना जास्त धावसंख्या उभारणे भारताला जमलं नाही तसंच प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स मिळवणंही भारताला अवघड गेलं. पाहूयात भारतीय संघाच्या पराभवाची 5 कारणं कोणती..? (India Vs England t20i match reason for England Defeat India)

टॉप ऑर्डर्सकडून पुन्हा निराशा

भारताच्या टॉप ऑर्डर्सने पुन्हा एकदा निराशा केली. के.एल. राहुल, इशान, किशान आणि रोहित शर्मा यांना चमकदार खेळी करता आली नाही. के.एल. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. किशान 4 तर रोहित 15 रन्सवर आऊट झाला. याचमुळे भारतीय संघाला मॅचमध्ये पुनरागमन करता आला नाही. पहिल्या टी 20 मध्ये देखील भारतीय टॉप ऑर्डर्स बॅट्समनने सपशेल निराशा केली होती.

खराब फिल्डिंग

पहिल्यांचा बॅटिंग केल्यानंतर आणि कमी स्कोअर झाल्यानंतर फिल्डिंग करताना पूर्ण ताकदीने फिल्डिंग करावी लागते. मात्र भारतीय संघाकडून फिल्डिंगमध्ये काही चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. भारतीय संघाच्या खेळाडूंनी इंग्लंड संघाच्या विकेट्स मिळवण्याच्या अनेक संधी गमावल्या. विराट कोहली आणि युजवेंद्र चहलने कॅचेस सोडल्या तर शार्दुल ठाकूरने म्हणावी अशी फिल्डिंग केली नाही. इशान किशननेही क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवली नाही. साहजिक किशन आणि शार्दुलच्या हातात चेंडू गेल्यानंतर रन्स मिळवणं इंग्लंड संघाला सोपं गेलं.

पॉवरप्लेमध्ये शांत खेळ

पहिल्या पॉवप्लेधमध्ये फलंदाजांनी आक्रमक खेळ करुन प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणायचं असतं. मात्र पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय फलंदाज 24 धावाच करु शकले. टॉप ऑडर्सच्या निराशाजनक खेळीनंतर अंतिमत: भारतीय संघाने 157 धावा केल्या. इथेच भारतीय संघ बॅकफूटला गेला. जास्त रन्स न झाल्याने इंग्लंड संघाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं.

पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट्स मिळाल्या नाहीत

भारत फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स मिळाल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या बॅटिंग दरम्यानच्या पॉवरप्लेमध्ये भारताला केवळ एकच विकेट्स मिळवता आली. या टी ट्वेन्टी मालिकेत भारताच्या बाबतीत असं दुसऱ्यांदा घडतंय की पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश येतंय.

जोस बटलरला रोखण्यात अपयश

इंग्लंडच्या जोस बटलरने तिसऱ्या टी ट्वेन्टीत धमाकेदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. जॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं नाही.

हे ही वाचा :

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी

India vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.