AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी धोनीला फोन, मगच मैदानात उतरायाचा, ऋषभ पंतचं रहस्य उलगडलं

मुंबई : टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतने (Rishabh Pant) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या जबरदस्त कामगिरीचा आयसीसीने गौरव केला. आयसीसीने त्याला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा (ICC Men’s Emerging Cricketer of the Year) 2018 पुरस्कार जाहीर केला. इतकंच नाही तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील आयसीसीच्या कसोटी संघात ऋषभ पंतलाही स्थान देण्यात आलं. पंतच्या जबरदस्त कामगिरीचं श्रेय टीम […]

आधी धोनीला फोन, मगच मैदानात उतरायाचा, ऋषभ पंतचं रहस्य उलगडलं
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतने (Rishabh Pant) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या जबरदस्त कामगिरीचा आयसीसीने गौरव केला. आयसीसीने त्याला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा (ICC Men’s Emerging Cricketer of the Year) 2018 पुरस्कार जाहीर केला. इतकंच नाही तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील आयसीसीच्या कसोटी संघात ऋषभ पंतलाही स्थान देण्यात आलं. पंतच्या जबरदस्त कामगिरीचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जातं. त्याबाबचा खुलासा टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीच केला आहे. ऋषभ पंत प्रत्येक कसोटी मालिकेदरम्यान दररोज धोनीला फोन करुन त्याच्याशी सल्लामसलत करत होता, असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.

युवा पंतने आतापर्यंत 9 कसोटी, 3 वन डे आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत.

धोनीबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “धोनी संघात नसला तरी तो टीममध्ये असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, ऋषभ पंत सातत्याने धोनीशी बातचीत करत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, पंत दररोज धोनीशी फोनवरुन बोलत होता. या संपूर्ण मालिकेत पंत सर्वात जास्त केवळ धोनीशीच बोलत होता. पंत धोनीला आपला हिरो मानतो, त्याला धोनीसारखंच व्हायचं आहे”

दरम्यान, धोनीसारखा खेळाडू 30-40 वर्षातून एकदा येतो. धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही, अशी स्तुतीसुमनं रवी शास्त्री यांनी उधळली होती.

धोनीसारखे खेळाडू 30-40 वर्षातून एकदा येतात. मी भारतीयांना हेच सांगतो, जोपर्यंत धोनी खेळत आहे, तोपर्यंत आनंद लुटा. धोनीने निवृत्ती घेतली तर निर्माण होणारी पोकळी भरुन निघणार नाही, असंही रवी शास्त्रींनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

ICC चे सगळेच पुरस्कार विराटला, तीनही अवॉर्ड जिंकणारा एकमेव क्रिकेटर

ICC रँकिंग : भारत आणि विराट सर्व काही अव्वल!

‘मी सचिनला चिडलेलं पाहिलंय, पण धोनीला नाही’  

14 वर्ष खेळूनही मी ‘ती’ तक्रार करु शकत नाही: धोनी   

IND vs AUS: भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकली!  

धोनीला सचिन तेंडुलकरचा एक सल्ला 

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.