IPL 2021 मधील उर्वरित सामने कुठे होणार? ‘या’ 3 देशांची नावं चर्चेत, BCCI समोर मोठं आव्हान

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्यात आला. त्यानंतर उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

IPL 2021 मधील उर्वरित सामने कुठे होणार? 'या' 3 देशांची नावं चर्चेत, BCCI समोर मोठं आव्हान
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 5:32 PM

मुंबई | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्यात आला. त्यामुळे आता उर्वरित सामने कुठे खेळवण्यात येणार, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. तसेच बीसीसीआयसमोर (BCCI) उर्वरित सामन्यांचे आयोजनाचं मोठं आव्हान आहे. या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलला सुरुवात झाली. त्यानंतर 2 मे पर्यंत 29 सामने खेळवण्यात आले. त्यामुळे आता एकूण 31 सामने बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने कुठे खेळवायचे, असा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. हे सामने सप्टेंबर 2021 मध्ये खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र अजूनही याबाबत काहीच ठरलेलं नाही. (remaining 31 matches of IPL 2021 are likely to be played in the UAE Australia or England)

केव्हा होणार स्पर्धा?

टाइम्स ऑफ इंडियानुसार, “आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे भारतात होणार नाही. हे सामने दुसऱ्या देशात खेळवण्यात येतील. तसेच बीसीसीआ या सामन्यांचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करु शकते. या महिन्यां दरम्यान इतर कोणत्याही क्रिकेट मालिका प्रस्तावित नाही. त्यामुळे ही वेळ योग्य आहे. भारतात कोरोनाचा प्रसार वाढतोय. त्यामुळे परदेशी खेळाडू उर्वरित सामन्यांसाठी पुन्हा भारतात येणार नाहीत. परदेशी खेळाडू हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ते नसले तर या स्पर्धेला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. टीओआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ” उर्वरित सामने परदेशातच खेळवले जातील. याबाबत अनेकांकडून मत मांडली जात आहेत. याबाबत काहीच ठरलं नाही.”

बीसीसीआयसमोर उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी 3 पर्याय आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा यूएईमध्ये मॅचेस खेळवण्यात येऊ शकता. आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते. त्यावेळेस यशस्वीरित्या या हंगामाचं आयोजन केले होते.

यूएईत वातावरणाची डोकेदुखी

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. त्यानंतर इंग्लिश खेळाडू हे थेट यूएईला येऊ शकतात. उर्वरित सामने पूर्ण झाल्यानंतर एका आठवड्याच्या क्वारंटाईननंतर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दरम्यानच्या काळात हे सामने खेळवण्यात येऊ शकतात. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन 22 ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित आहे. मात्र यूएईमध्ये वातावरणाबाबत डोकेदुखी आहे. सप्टेंबरमध्ये इथे मोठ्या प्रमाणात वातावरण गरम असतं. ऑक्टोबरनंतर उष्णता ओसरायला सुरुवात होते.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाही स्पर्धेत

या सामन्यांच्या आयोजनासाठी यूएईसह इंग्लंड आणि ऑस्टेलियाही स्पर्धेत आहे. इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यास टीम इंडिया आणि इंग्लिश खेळाडूंसाठी ते फायदेशीर ठरेल. तसेच इतर खेळाडूंसाठीही हे सोयीचे ठरेल. तर इंग्लंडमधील वातावरणही सरासरी असतं. राहिला प्रश्न तर ऑस्ट्रेलियाचा. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. मात्र त्यावरही कोरोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे जर या वर्ल्ड कप स्पर्धेच आयोजन ऑस्ट्रेलियात झाल्यास उर्विरत सामने तिथे खेळवता येतील. मात्र याबाबत अजूनही चर्चाच आहे. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, हे येत्या काळातच समजेल.

संबंधित बातम्या :

PHOTO | IPL 2021 स्थगितीमुळे फ्लॉप शो करणाऱ्या ‘या’ खेळाडूंच्या जीवात जीव, कोण आहेत ते क्रिकेटपटू?

आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?

(remaining 31 matches of IPL 2021 are likely to be played in the UAE, Australia or England)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.