AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 मधील उर्वरित सामने कुठे होणार? ‘या’ 3 देशांची नावं चर्चेत, BCCI समोर मोठं आव्हान

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्यात आला. त्यानंतर उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

IPL 2021 मधील उर्वरित सामने कुठे होणार? 'या' 3 देशांची नावं चर्चेत, BCCI समोर मोठं आव्हान
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह
| Updated on: May 06, 2021 | 5:32 PM
Share

मुंबई | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्यात आला. त्यामुळे आता उर्वरित सामने कुठे खेळवण्यात येणार, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. तसेच बीसीसीआयसमोर (BCCI) उर्वरित सामन्यांचे आयोजनाचं मोठं आव्हान आहे. या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलला सुरुवात झाली. त्यानंतर 2 मे पर्यंत 29 सामने खेळवण्यात आले. त्यामुळे आता एकूण 31 सामने बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने कुठे खेळवायचे, असा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. हे सामने सप्टेंबर 2021 मध्ये खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र अजूनही याबाबत काहीच ठरलेलं नाही. (remaining 31 matches of IPL 2021 are likely to be played in the UAE Australia or England)

केव्हा होणार स्पर्धा?

टाइम्स ऑफ इंडियानुसार, “आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे भारतात होणार नाही. हे सामने दुसऱ्या देशात खेळवण्यात येतील. तसेच बीसीसीआ या सामन्यांचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करु शकते. या महिन्यां दरम्यान इतर कोणत्याही क्रिकेट मालिका प्रस्तावित नाही. त्यामुळे ही वेळ योग्य आहे. भारतात कोरोनाचा प्रसार वाढतोय. त्यामुळे परदेशी खेळाडू उर्वरित सामन्यांसाठी पुन्हा भारतात येणार नाहीत. परदेशी खेळाडू हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ते नसले तर या स्पर्धेला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. टीओआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ” उर्वरित सामने परदेशातच खेळवले जातील. याबाबत अनेकांकडून मत मांडली जात आहेत. याबाबत काहीच ठरलं नाही.”

बीसीसीआयसमोर उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी 3 पर्याय आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा यूएईमध्ये मॅचेस खेळवण्यात येऊ शकता. आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते. त्यावेळेस यशस्वीरित्या या हंगामाचं आयोजन केले होते.

यूएईत वातावरणाची डोकेदुखी

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. त्यानंतर इंग्लिश खेळाडू हे थेट यूएईला येऊ शकतात. उर्वरित सामने पूर्ण झाल्यानंतर एका आठवड्याच्या क्वारंटाईननंतर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दरम्यानच्या काळात हे सामने खेळवण्यात येऊ शकतात. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन 22 ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित आहे. मात्र यूएईमध्ये वातावरणाबाबत डोकेदुखी आहे. सप्टेंबरमध्ये इथे मोठ्या प्रमाणात वातावरण गरम असतं. ऑक्टोबरनंतर उष्णता ओसरायला सुरुवात होते.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाही स्पर्धेत

या सामन्यांच्या आयोजनासाठी यूएईसह इंग्लंड आणि ऑस्टेलियाही स्पर्धेत आहे. इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यास टीम इंडिया आणि इंग्लिश खेळाडूंसाठी ते फायदेशीर ठरेल. तसेच इतर खेळाडूंसाठीही हे सोयीचे ठरेल. तर इंग्लंडमधील वातावरणही सरासरी असतं. राहिला प्रश्न तर ऑस्ट्रेलियाचा. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. मात्र त्यावरही कोरोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे जर या वर्ल्ड कप स्पर्धेच आयोजन ऑस्ट्रेलियात झाल्यास उर्विरत सामने तिथे खेळवता येतील. मात्र याबाबत अजूनही चर्चाच आहे. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, हे येत्या काळातच समजेल.

संबंधित बातम्या :

PHOTO | IPL 2021 स्थगितीमुळे फ्लॉप शो करणाऱ्या ‘या’ खेळाडूंच्या जीवात जीव, कोण आहेत ते क्रिकेटपटू?

आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?

(remaining 31 matches of IPL 2021 are likely to be played in the UAE, Australia or England)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.