AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : चुकीला माफी नाहीच, वेस्ट इंडिजशी भिडण्यापूर्वी कॅप्टन सूर्या नाराज? दिला मोठा इशारा

टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये काल झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवून भारताने सेमीफायनलमध्ये पोहोण्याच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु विजय मिळून देखील कर्णधार सूर्यकुमार यादव समाधानी नव्हता. चेपॉक येथे 256 धावा करूनही भारताने प्रतिस्पर्धी संघाला 184 धावा करू दिल्या. यामुळे कॅप्टन नाराज असून पुढच्या सामन्यापूर्वीच त्याने मोठा इशारा दिला आहे.

Team India : चुकीला माफी नाहीच, वेस्ट इंडिजशी भिडण्यापूर्वी कॅप्टन सूर्या नाराज? दिला मोठा इशारा
टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन असमाधानी ?Image Credit source: social media
| Updated on: Feb 27, 2026 | 10:03 AM
Share

आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्डकपच्या चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने काल झिम्बाब्वेवर शानदार विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडिया सेमीफायनमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. मात्र असं असलं तरीही , झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवूनही भाराताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा काही फार खुश दिसल नाही. उलट संघाच्या गोलंदाजीमुळे तो असमाधानीच होता. विजय मिळवणं गरजेचं आहेत. पण नॉकआीट सामन्यापूर्वी टीमला आणखी चांगली तयारी करून उत्तम खेळ करावा लागेल, असंही तो म्हणाला.

काल, गुरुवार (26 फेब्रुवारी) भारतीय फलंदाजांनी उल्लेखनीय वापसी केली आणि 4 गडी गमावून झिम्बाब्वेसमोर 256 धावांचा डोंगर उभा केला. सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघासाठी कालची कामगिरी खूप महत्त्वाची होती.

मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे कधीही जिंकण्याच्या स्थितीत दिसत नव्हते, तरीही त्यांनी 6 गडी गमावत 184 धावा केल्या, टफ फाईट दिली. सहावा गोलंदाज म्हणून आलेल्या शिवम दुबेच्याबलिंगवर 2 षटकांत 46 धावा चोपण्यात आल्या. त्यामुळे कर्णधार यादव चिंतेत पडला.

कॅप्टन झाला नाराज ?

मॅच जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवची नाराजी साफ झळकत होती. सामन्यानंतर बोलताना त्याने यावर स्पष्ट मत मांडलं, “आम्ही बॉलने अधिक चांगले कामगिरी करू शकलो असतो. विजय हा विजय असतो, परंतु आम्हाला आमच्या आणखी पर्यायांसह, अजून थोडं स्मार्ट बनण्याची गरज आहे आम्ही वेस्ट इंडिजविरुद्ध आमच्या चुका सुधारू.” असंही त्याने नमूद केलं.

1 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. सेमीफायनमध्ये पोहोचायचं असेल तर भारतासाठी हा करो या मरो असाच सामना ठरणार आहे.

झिन्बाब्वेसमोर भारताची कामगिरी

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाने भूतकाळातील चुका मागे टाकण्याचा प्रयत्न केला, असंही कर्णधार सूर्याने सांगितले. “आम्ही लीग स्टेज किंवा मागील सामन्याबद्दल जास्त विचार केला नाही. आमच्या व्हिडिओ ॲनलिस्टने गेल्या वर्षभरातील आमच्या सकारात्मक कामगिरीचे प्रेझेंटेशन तयार केलं. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि आम्ही पूर्ण स्पष्टतेने मैदानात उतरलो होतो” असं त्याने नमूद केलं. गोलंदाजीबद्दल चिंता असली तरी कॅप्टनने फलंदाजांचे मनापासू कौतुक केलं. टॉप ऑर्डरपासून ते सातव्या क्रमांकापर्यंत सर्वांनी चांगलं योगदान दिल आणि कामगिरी जवळजवळ परिपूर्ण होती, असं म्हणत त्याने समाधान व्यक्त केलं.

Follow Us
मुंबईत कॉलेजचं नाव गुजरातीत! हा महाराष्ट्र आहे की गुजरात?
मुंबईत कॉलेजचं नाव गुजरातीत! हा महाराष्ट्र आहे की गुजरात?.
टिपू चांगला की वाईट यावर आक्षेप नाही...; फडणवीसांनी घेतला समाचार
टिपू चांगला की वाईट यावर आक्षेप नाही...; फडणवीसांनी घेतला समाचार.
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.