AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वचषकाची सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास पुढे काय होतं?

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 वर अनेकदा पावसाचं सावट राहिलं. त्यामुळे 45 पैकी 4 सामने रद्दही झाले. पावसामुळे इतके सामने रद्द होण्याची ही विश्वचषकातील पहिली वेळ आहे.

विश्वचषकाची सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास पुढे काय होतं?
| Updated on: Jul 09, 2019 | 6:32 PM
Share

मँचेस्टर: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 वर अनेकदा पावसाचं सावट राहिलं. त्यामुळे 45 पैकी 4 सामने रद्दही झाले. पावसामुळे इतके सामने रद्द होण्याची ही विश्वचषकातील पहिली वेळ आहे.

आता सेमीफायनल आणि फायनलवरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे जर पावसामुळे सेमीफायनल आणि फायनल दोन्ही सामने रद्द झाले तर काय होणार असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. जर असं झालं तर मग विश्वचषक विजेता संघ कसा ठरणार हा देखील अनेकांना पडलेला प्रश्न.

विजेता मैदानावरच ठरावा यासाठी अनेक नियम

आयसीसीने विजेता मैदानावरच ठरावा यासाठी अनेक नियम बनवले आहेत. मालिकेतील सामन्यांसाठी केलेल्या नियमांनुसार आयसीसीने दोन सेमीफायनल आणि फायनलसाठी प्रत्येकी एक राखीव दिवसाचीही निवड केली आहे. याद्वारे एकदा सामना रद्द झाला तरी तो पुन्हा अन्य दिवशी खेळला जावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यानुसार पहिल्या सेमीफायनलसाठी 10 जुलै, दुसऱ्या सेमीफायनलसाठी 12 जुलै आणि फायनलसाठी 15 जुलै या राखील दिवसांची निवड केली आहे. या नियोजनामुळे सामन्यात कोठेही अडथळा आला तर तो सामना राखीव दिवशी खेळवला जातो. संबंधित सामना त्याच दिवशी पूर्ण व्हावा यासाठीच प्रयत्न होतात. त्यासाठी 20 षटकांपर्यंत कपात करणे अथवा 2 तास खेळ वाढवणे असे पर्याय देखील उपलब्ध असतात.

सामना एकही चेंडू न खेळता पूर्णपणे रद्द झाला तर?

एखादा सामना एकही चेंडू न खेळता पूर्णपणे रद्द झाला तर मग विजेता कसा ठरवणार असाही प्रश्न शिल्लक राहतो. अशा स्थितीत गुणतालिकेत सर्वाधिक गुण असलेल्या संघांना फायदा होतो. या नियमाप्रमाणे जर भारत-न्युझीलंड सामना रद्द झाला तर भारत थेट फायनलमध्ये जाईल. कारण गुणतालिकेत भारत पहिल्या तर न्युझीलंड चौथ्या स्थानी आहे. अशीच स्थिती ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडम सामन्यात तयार झाली तर दुसऱ्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल.

अंतिम सामन्यासाठीचे नियम

फायनल सामना पावसाच्या अथवा अन्य कारणाने निश्चित दिवशी आणि राखीव दिवशी रद्द झाला तर फायनलमधील दोन्ही संघाना विजेतेपद विभागून दिले जाते.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.