AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या आयात बंदीवर सरकारचा पुन्हा नवा निर्णय, कंपन्यांना दिले हे आदेश

केंद्र सरकारने संगणक साहित्याच्या आयात बंदी आदेशाबाबत नवा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या संदर्भात ट्वीटही केले आहे.

लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या आयात बंदीवर सरकारचा पुन्हा नवा निर्णय, कंपन्यांना दिले हे आदेश
rajeev chandrashekharImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 04, 2023 | 9:57 PM
Share

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट आणि कंप्युटरच्या आयातीवर कालच बंदी घातली होती. आता सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला थोडा आस्ते कदम धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना आयात करण्यासाठी लागणाऱ्या लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी कंपन्यांना मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यासंदर्भात ट्वीट करीत सरकार या निर्णयाची अमलबजावणी महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक वेळाने करणार असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने लॅपटॉप, संगणक आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय काल गुरुवारी जाहीर केला होता. हा निर्णय देशांतर्गत लॅपटॉप, संगणक निर्मितीला चालना देण्यासाठी घेतला असल्याचा दावा सरकारने केला होता. तसेच या निर्णयाचा चीनला दणका बसणार असल्याचे सरकारने म्हटले होते. या निर्णयाने केवळ लायसन्स असणाऱ्या कंपन्यांनाच लॅपटॉप आदी सामग्रीची परदेशातून आयात करता येणार आहे. परंतू या निर्णयामुळे संगणक साहित्याची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे ट्वीट पाहा 

आता केंद्र सरकारने संगणक साहित्याच्या आयात बंदी आदेशाची लागलीच अमलबजावणी करणार नसल्याचे म्हटले आहे. कंपन्यांना आयातीसाठी लायसन्स मिळावे यासाठी सरकार त्यांना अर्ज करण्यासाठी वाढीव मुदत देणार आहे. त्यामुळे आधीच जारी केलेल्या आयातीच्या कन्साईन्मेंट किंवा शिपमेंटला काही अडचणी येऊ नयेत याची काळजी घेण्याचेही सरकारने ठरविले आहे.

केंद्र सरकार लॅपटॉप, टॅबलेट आणि संगणकाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा आणि केवळ अधिकृत आयात परवाना असणाऱ्यांनाच यातून सूट देण्याचा निर्णय केवळ मेक इन इंडीया धोरणासाठी नव्हे तर सुरक्षेच्या दृष्टीने घेतला असल्याचे म्हटले जात आहे. परंतू सरकारने आता कंपन्यांना लायसन्ससाठी अर्ज करायला मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.