AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न मंडप बनला कुस्तीचे मैदान, व्हऱ्हाडी मंडळी एकमेकांच्या उरावर बसली,असं काय घडलं?

या घटनेची चौकशी केली जात आहे. दोन्ही पक्षांना समोरासमोर बोलावले आहे. परंतू ते समझौता करण्यास तयार नाहीत. आता जो कोणी तक्रार नोंदवेल त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे डीसीपी साऊथ झोन केशव कुमार यांनी सांगितले.

लग्न मंडप बनला कुस्तीचे मैदान, व्हऱ्हाडी मंडळी एकमेकांच्या उरावर बसली,असं काय घडलं?
| Updated on: Nov 18, 2024 | 4:49 PM
Share

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अनेक जणांचे विवाह होत आहेत. परंतू एका विवाह मंडपात वर पक्ष आणि वधू पक्षातील व्हऱ्हाडी मंडळीत तुफान हाणामारी झाली आहे.या हाणामारीत महिलांना देखील पुढाकार घेतला आणि त्या एकमेकांच्या झिंज्या खेचू लागल्या. हा गोंधळ पाहून वधू-वराचे ताळतंत्र बिघडले. वराने तर स्टेज वरुन उडी मारत हा हाणामारीत सक्रीय सहभाग घेतला.या भांडणाला नेमके कारण काय हे नंतर उघडकीस आले.

लखनऊ येथील मोहनलालगंज येथील लग्न समारंभात हे रणकंदन झाले आहे.मोहनलालगंज निवासी शेतकरी सुखलाल यांची मुलगी आरती हीचे लग्न उन्नाव जिल्ह्यात राहणाऱ्या कमलेश यांच्याशी ठरले होते. लग्नाची वाजत गाजत वरात आल्यानंतर मुख्य अक्षता कधी पडतात याची वाट पाहात दोन्हीकडची मंडळी होती. परंतू वराकडील मंडळी जेथे उतरली होती. तेथील काही मंडळी मद्याच्या नशेत होती. त्यांनी नाश्त्यावरुन वधू पक्षाच्या मंडळीवर आग पाखड केली. हे निमित्त ठरले आणि त्यातून शब्दाला शब्द वाढत गेला. हा प्रकार अखेर घरातील बुजुर्ग मंडळींनी चर्चा करुन अखेर शांत केला. आणि कार्यक्रम सुरु झाला.परंतू जेव्हा लग्नाचा मुख्यविधी सुरु झाला तेव्हा स्टेजवर पोहचलेल्या दोन्ही पुन्हा वादावादी सुरु झाली. त्यानंतर शाब्दीक संघर्ष लाथा बुक्क्यांवर आला.

महिलांनी देखील हाणामारी केली

मुलीकडील मंडळींना जेव्हा पाहीले की वधू पक्षाची मंडळी मार खात आहेत,तेव्हा ते भडकले आणि वरापक्षाकडील मंडळींना चोपू लागले.थोड्याच वेळा लग्नाचा मंडप युद्धाचे मैदान झाले. या दरम्यान, वराने गळ्यातील हार तोडून फेकत स्टेजवरुन उडी मारीत मारामारीत सहभाग घेतला. वधू या धक्क्याने स्टेजच्या खाली कोसळली.

स्टेजच्या खाली पुरुषांच्या बरोबरीला महिला देखील या मारामारीत सहभागी झाली. महीला एकमेकींचे केस ओढुन मारामारी करु लागल्या. त्यानंतर समारंभातील प्लास्टिकच्या खुर्च्या एकमेकांना फेकून मारण्यास सुरुवात झाली. दोन्ही पक्षांना समजविण्याचा प्रयत्न सुरु झाला. परंतू कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या दरम्यान वराच्या भावाच्या गाडीची काच देखील कोणीतरी फोडली.

दारु की हुंडा ?

वर पक्षाकडील काही मंडळी दारुच्या नशेत असल्याने हे भांडण सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही पक्षांतील मंडळीनी यात सहभाग घेतला.मुलीकडच्या मंडळींच्या मते लग्न ठरल्यानंतर अचानक वराने कारची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्याने अखेर दोन लाखाची बाईकची मागणी मान्य करण्यात आली. फ्रिजपासून टीव्हीपर्यंत सर्व देण्यात आले होते. परंतू मागण्यावरुन धुसफूस सुरुच होती.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.