AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेल-एक्सप्रेसचे तिकीट हरवले तरी प्रवास करता येतो का ? नियम जाणून घ्या

लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करताना तर तिकीट हरविले तरी प्रवास करता येतो, परंतू याबाबत रेल्वेचे काही नियम आहेत, काय आहेत ते नियम पाहूयात...

मेल-एक्सप्रेसचे तिकीट हरवले तरी प्रवास करता येतो का ?  नियम जाणून घ्या
indian-railwaysImage Credit source: indian-railways
| Updated on: May 27, 2023 | 2:13 PM
Share

मुंबई : भारतीय रेल्वेचे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक आहे. भारतात रोज सुमारे दोन कोटी लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये एसीची सुविधा, खानपान व्यवस्था, कन्फर्म सिट आणि शौचालय आदीमुळे प्रवास सुसह्य होतो. यात स्लीपर क्लास सह एसी क्लासच्या दर्जाचा प्रवास करता येतो. परंतू आपल्याला लांबपल्ल्याच्या ट्रेनचे तिकीट थोडे आधी काढावे लागते. अनेक मार्गांवर तिकीटांची मागणी एवढी आहे की वेटींगचे तिकीट मिळते. आता अनेक जण ऑनलाईन तिकीटे काढत असले तरी आताही अनेक जण तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट काढतात. परंतू तुमचे तिकीट हरविले तर काय आहेत रेल्वेचे नियम ? पाहूयात

नियम काय आहेत ?

समजा तुम्ही लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणार आहात आणि तुमचे तिकीट खिडकीहून काढलेले तिकीट हरवले ? अशा स्थितीतही तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकता. कारण यासाठी एक महत्वाचा नियम आहे. त्यामुळे तुम्ही काही नियम पाळला तर तुम्हाला तुमचे तिकीट हरवून देखील प्रवास करता येतो.

जर तुमचे तिकीट प्रवास करण्यापूर्वी जर हरविले तर तुम्हाला तुमचे नविन तिकीट 50 रूपयांचा दंड भरून पुन्हा तयार करता येते. परंतू तुम्ही विचार करत असाल की तिकीट तर काढले होते. परंतू हरविले तर पन्नास रुपये दंड कशाला ? परंतू पन्नास रूपये दंड भरावाच लागतो. जर तुम्ही हा पन्नास रुपयाचा दंड भराला नाही तर तुम्हाला रेल्वेच्या नियमानूसार खूप जास्त दंड आकाराला जाऊ शकतो.

टीसीशी करा संपर्क….

जर तुम्ही प्रवास करताना तुमचे तिकीट गहाळ झाले तर तुम्ही ट्रेनच्या टीटीई किंवा तिकीट तपासनीसाला गाठावे लागेल, त्याला तिकीट हरविल्याचे सांगावे लागेल, त्यानंतर टीसी तुम्हाला नविन तिकीट जारी करेल. नविन तिकीट बनविता आपण आपले गंतव्य स्थानक देखील बदलू शकता. उदाहरणार्थ तुम्ही दिल्ली ते कानपूर जात आहात. परंतू नविन तिकीट तुम्ही दिल्ली ते वाराणसीचे देखील बनवू शकता, मात्र त्याचा अतिरिक्त नियमानूसार पैसे भरावे लागेल,

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.