4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 10:47 AM

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे.