आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस आंदोलन केले, राज्य सरकारकडून त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर देखील त्यांचे आंदोलन सुरूच होते. मात्र त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार 75 टक्के एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. उर्वरित कर्मचारी देखील लवकरच कामावर रुजू होणार असून, पुन्हा एकदा लालपरी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.