मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात हॉटेल शिवनेरी जवळ चालत्या ट्रकने पेट घेतला. सकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. लोखंडाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना या ट्रकने पेट घेतला. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर टोलच्या अग्निशमन दल आणि महिंद्रा अग्निशमन दलला यश आले. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. काही काळ मुंबई नाशिक लेनची ट्राफिक जाम होती.