Special Report | बंडखोरी नाही ती गद्दारीच

| Updated on: Jul 21, 2022 | 9:05 PM

ज्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असतानाच यांनी गद्दारी करून बंडखोरी केल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्बेतेची माहिती देत ज्या वेळी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याचवेळी आपण कोण मुख्यमंत्री होणार याबाबच चर्चा करण्यात येत होती.

Follow us on

युवासेना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा संवाद यात्रा चालू केली आहे, या संवाद यात्रेत ते बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल करत बंडखोर आमदारांवार थेट गद्दारीचा आरोप केला आहे. ज्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असतानाच यांनी गद्दारी करून बंडखोरी केल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्बेतेची माहिती देत ज्या वेळी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याचवेळी आपण कोण मुख्यमंत्री होणार याबाबच चर्चा करण्यात येत होती. त्यामुळे हे बंडखोर आमदार नाहीत तर हे गद्दारच आहेत असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर एकनाथ शिंदेय यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना सांगितले की, त्यांना जे बोलायच आहे ते बोलू  द्या, त्यांना समाधान मिळत असेल तर ते बोलत राहू द्या असं मतही त्यांनी व्यक्त केले.