मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकाकडून विचार केला जात आहेत. मात्र, विरोधी पक्ष भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला असून काही प्रमाणात निर्बंध घालेवेत अशी भूमिका घेतली आहे. याच प्रश्नावर बोलताना राज्य सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच राज्यात कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरजही त्यांनी व्यक्ती केली.