बऱ्याच जणांचं म्हणनं आहे शाळा सुरु करा, काही जणांचं म्हणनं शाळा सुरु करु नका असं आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं कोरोना लसीकरण प्राधान्यानं करावं, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. जसं दिव्यांग व्यक्ती, देहविक्रय करणाऱ्या महिलांना दोन्ही लसीकरणात प्राधान्य दिलं. त्याप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शिक्षकांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.