Amit Thackeray | 25 वर्षे सत्ता असणाऱ्यांनी काहीच केलं नाही, अमित यांचा आदित्य ठाकरेंना टोला

Amit Thackeray | 25 वर्षे सत्ता असणाऱ्यांनी काहीच केलं नाही, अमित यांचा आदित्य ठाकरेंना टोला

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 11, 2021 | 12:38 PM

समुद्र किनारे हा एक ठेवा आहे तो सुरक्षित राहिला पाहिजे, ज्यांची 25 वर्षे सत्ता होती त्यांनी काहीच केलं नाही असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबवणार अशा आशयाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. याच पार्श्वभूमीवर आज दादर येथे सकाळी 10 वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अमित ठाकरे या स्वच्छता अभियानात सहभागी झाले. यावेळी समुद्र किनारे हा एक ठेवा आहे तो सुरक्षित राहिला पाहिजे, ज्यांची 25 वर्षे सत्ता होती त्यांनी काहीच केलं नाही असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

Follow Us