“कुणी एक हिंदी दिग्दर्शकसुद्धा मुघलशासक हे राष्ट्रनिर्माते होते अशी मांडणी करू पाहतो तेव्हा याचा आणखी गांभीर्याने विचार व्हायला हवा.
जे आहे ते उजळ माथ्याने मांडायला हवे , ज्याचे जे आणि जेवढे योगदान आहे तेच समोर यायलाही हवे. परंतु अकारण स्तोम माजवून माथी मारण्याचे प्रकार थांबवायला हवेत. ही प्रबोधनाची वैचारिक लढाई त्याच माध्यमातून लढायला हवी.केलेला निषेध अथवा आंदोलन क्षणिक ठरू शकते. परंतु साहित्य, कलाकृती यांचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो याचा विचार व्हायला हवा, असेही अमोल कोल्हे म्हणाले.