अंजली दमानियांचा कृषी घोटाळ्याचा आरोप, 200 कोटींच्या ‘त्या’ आरोपांवर मुंडेंनी स्पष्टच म्हटलं…

अंजली दमानियांचा कृषी घोटाळ्याचा आरोप, 200 कोटींच्या ‘त्या’ आरोपांवर मुंडेंनी स्पष्टच म्हटलं…

| Updated on: Feb 20, 2025 | 5:57 PM

अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप केले. मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत २०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. तर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप केले. मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत २०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. तर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती, असं धनंजय मुंडे म्हणाले. अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतायत ते पत्र नसून टिपण आहे असून टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता आहे. कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत ते आरोप फेटाळून लावले आहेत. तर अंजली दमानिया फक्त मिडीया ट्रायलसाठी आरोप करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. तर आम्ही खोटी कागदपत्र तयार केली असतील तर योग्य त्या मंचावर तक्रार करावी असं थेट आव्हान देखील धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलंय. बदनामीबद्दल अंजली दमानिया यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील मुंडे यांनी दिली.

Published on: Feb 20, 2025 05:57 PM
Follow Us