ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी, असं विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अस्लम शेख यांनी हे मोठं विधान केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होऊ शकते. तसंच लोकल प्रवासाबाबतही चर्चा होण्याची शक्यताआहे.