Aurangabad | पुराच्या पाण्यात वाहून जाणारी गाडी वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्न

| Updated on: Oct 08, 2021 | 4:36 PM

 गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा (Heavy rain in Aurangabad) फटका बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या पूलांवरून पाणी वाहत आहे.

Follow us on

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा (Heavy rain in Aurangabad) फटका बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या पूलांवरून पाणी पाहत आहे. औरंगाबादेतील गारज गावातही (Garaj village) अशीच एक घटना घडली. पूलावरून वाहणाऱ्या पाण्यातून बाईक नेताना एक बाईकस्वार पाण्यात वाहून गेला. मात्र त्याला वाचवण्यासाठी अवघा गाव एकवटला आणि जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात (Rescue operation ) आले.

सततच्या अतिवृष्टीमुळे ढेकू नदीवरील पूलावरून पाणी जात आहे. जीवनावश्यक कामे करण्यासाठी नागरिकांना येथून ये-जा करावी लागते. शुक्रवारी असाच एक बाइकस्वार या पुलावरून जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे बाइकसहीत तो पाण्यात पडला. हे गारज गावातील अनेक नागरिक त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र बाइकमध्ये अडकल्याने या नागरिकाला बाहेर काढता येत नव्हते.