मुंबई : कोरोनामुळे रोज माणसे मरत असताना राज्य सरकार उपाययोजना करायला कमी पडत आहे. आरोग्य खात्याने कोरोनावर उपाय करण्यासाठी कुठलेही नियोजन केले नाही, राज्याचे आरोग्य मंत्री हे आरोग्य खात्याचा कारभार सांभाळताना लोकांना वाचवण्यात नापास झाले आहेत अशी टीका माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.