प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप मतमोजणी सुरू आहे निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे निकाल हाती आल्यावर स्पष्ट होईल. या निवडणुकीवरून मविआचं वारं तयार झालं, असं म्हणता येणार नाही.प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगवेगळं असतं.त्यामुळे संपूर्ण निकाल लागल्यावर यावर प्रतिक्रिया देईल, असं बच्चू कडू म्हणालेत. विजयी उमेदवारांचं अभिनंदन, असंही बच्चू कडू म्हणालेत.