मुंबई: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी अयोध्येत येऊन दाखवावेच. त्यांना आम्ही अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मनसेनेच हा संभ्रम दूर केला आहे. कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी घेऊ द्या. टोकाची भूमिका आम्हालाही घेता येते. एकाने गाय मारली म्हणून वासरू मारायचे नसते, असं सांगत आमचा अयोध्या दौरा ठरलेला आहे.