Jay Pawar | जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवण्याचं आश्वासन, कारण विचार करायला लावणारं

Jay Pawar | जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवण्याचं आश्वासन, कारण विचार करायला लावणारं

| Updated on: Apr 20, 2026 | 4:54 PM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या दरम्यान जय पवारांनी एक मोठं विधान केलं आहे. नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग दिला आहे. दरम्यान जय पवारही मतदारांशी थेट संवाद साधत पक्षा बळकट करण्याचा प्रयत्न केला. ते सातत्याने गावागावात भेटी घेत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. उद्या या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत सांगता सभा आहे. या सांगता सभे आधीच जय पवारांनी एक मोठं विधान केलं आहे.

जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेते तसेच स्थानिक पातळीवर सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न स्थानिक नेते सोडवतील, इतकेच नाही तर गंभीर मुद्दे स्वतः जय पवार सोडवतील असं त्यांनी नमूद केलं.

Published on: Apr 20, 2026 04:54 PM
Follow Us