बायपासच्या उद्घाटनावरून अमोल कोल्हे, आढळराव पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झालेली दिसते आहे. अमोल कोल्हेंच्या आधी आढळरावांनी या बायपासचं उद्घाटन केलं आहे. देशभरात रस्ते निर्मितीचा चालना मिळत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात आलेत. विशेष म्हणजे हे सर्व केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात होत आहे. आता पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ताही तयार झाला असून, त्याचे फोटोही नितीन गडकरींनी (Nitin Gadkari)ट्विटरवर शेअर केले होते.