मुंबई: शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र तुमचे सद्सय असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल भास्कर जाधव यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.