युतीत 25 वर्ष राहून आमचंही नुकसान झालं, असं वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. 2014ला वेगळं लढल्यानंतर आमच्या 122 जागा आल्या. तेव्हा आम्हाला कळलं. मुंबई महापालिके(BMC)त 82 जागा आल्या. अमित शाहं(Amit Shah)नी ठरवलं असतं तर भाजपाचा महापौर झाला असता, असंही ते म्हणाले. तिथं तर केवळ दोनच जागा तुमच्यापेक्षा कमी होत्या, अशी टीका त्यांनी केली.