शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेवर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्याच दिवशी शिमगा करुन टाकला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी फक्त भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. पण राज्यातील महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते काहीच बोलले नाहीत, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.