बंडखोर आमदारांना केंद्राच्या वतीने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर टीका करण्यात आली आहे. भाजप कितीही म्हणत असेल की हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, मात्र आज राज्यात जे काही वगनाट्य सुरू आहे, त्यांची पटकथा ही भाजपानेच लिहीली असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.