वर्धा (Wardha) जिल्हा महिला व बाल विकास (Women & Child Welfare Department) अधिकारी कार्यालयाच्यावतीने ग्राम विकास संस्था, गोपुरी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील बाल व निरिक्षणगृहातील 12 वर्षाच्या वरील 64 बालकांना चरखा ओळख व सुत कताईचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ सोहळा झाला. त्यावेळी अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवरांनी बालगृहातील मुलांना मागदर्शन देखील केले. महात्मा गांधी व विनोबा भावे (Mahatma Gandhi, Vinoba Bhave) यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे हा संस्थेचा हेतू आहे. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतल्याची माहिती सुध्दा संस्थांनी सांगितली आहे.