नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादबाबत सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. तर, निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी( Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकालाचे स्वागत आहे. आमच्याकडे बहुमत आहे. विधानसभेत आणि लोकसभेतही आमच्याकडे बहुमत आहे. सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर विश्वास आहे.