22 आणि 23 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याला महापुराने वेढा घातला होता. चिपळूणमधील महापुराच्या हाहा:कारानंतर आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील नुकसाणाची पाहणी केली. मात्र या चिपळूण दौऱ्यादरम्यान नुकसाणाच्या पाहणीपेक्षा नागरिकांच्या रोषांचाच सामना मुख्यमंत्र्यांना जास्त करावा लागला. मुख्यमंत्र्याच्या या चिपळूण पाहणी दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडलं ते सांगणारा स्पेशल रिपोर्ट !