Sanjay Shirsat | अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर जातात आणि… शिरसाटांचा ठाकरेंना टोला

| Updated on: Mar 07, 2026 | 2:14 PM

“बुलंद आवाजाला विधानपरिषदेत जावे लागेल, परंतु तिथे बसणे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोन वेळा बसलेले मुख्यमंत्री विधानपरिषदेत किती काळ बसतील, हा प्रश्न आहे. अधिवेशनात फक्त 1–2 दिवस येणे, मीडियासमोर येणे आणि अधिवेशनाचा कार्यकाल संपले असे दर्शवणे, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेत उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षाचा बुलंद आवाज असल्याचे सांगितले आणि त्यांच्या पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले, “नक्कीच आमची इच्छा आहे की उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधानसभेत प्रवेश करावा. विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या की त्यावर चर्चा होईल.”
यावर प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “बुलंद आवाजाला विधानपरिषदेत जावे लागेल, परंतु तिथे बसणे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोन वेळा बसलेले मुख्यमंत्री विधानपरिषदेत किती काळ बसतील, हा प्रश्न आहे. अधिवेशनात फक्त 1–2 दिवस येणे, मीडियासमोर येणे आणि अधिवेशनाचा कार्यकाल संपले असे दर्शवणे, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Published on: Mar 07, 2026 02:14 PM
Follow Us