नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन महापालिकेच्या वतीने नाशिककरांना करण्यात आले आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी पालिकेच्या सहा विभागात विशेष पथकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे.