एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला. यामध्ये आता आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटावर टिका केली होती. त्यालाच प्रतिउत्तर दीपक केसरकर यांनी दिले असून केसरकर म्हणाले की, राऊतांना अनेक गोष्टी माहितही नसतात. शिवसेना सोडून गेलेले आमदार बंडखोरी केल्याची वेगवेगळी कारणं देत आहेत. कुणी आदित्य ठाकरे, पक्षातील इतर नेत्यांवर आरोप करत आहेत तर कुणी संजय राऊतांमुळे पक्ष सोडल्याचं सांगत आहेत. निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडल्याचंही अनेकांनी सांगितलं. त्यामुळे माझा या बंडोखोरांना सल्ला आहे. त्यांनी एकत्र बसून पुन्हा एकदा ठरवावं की नक्की पक्ष कशासाठी सोडलाय.