मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्राला चार मंत्रिपदं मिळाली. मात्र, खासदार प्रितमं मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिलं गेल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केलं आहे. प्रितम मुंडे नाराज असल्याचे तुम्हाला कोणी सांगितलं. कारण नसताना त्यांना बदनाम करु नका. सर्वोच्च नेते निर्णय घेत असतात, असे ते म्हणाले.